
महाराष्ट्रातील राजकारणाची "दशा आणि दिशा" या विषयावर नेमका प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा तेवढाच अभ्यास हवा! तसा अभ्यास असणारी आणि येथील राजकीय नेत्यांची खरी जातकुळी माहित असलेली जाणकार मंडळीही राज्यात आहे. परंतु निवडणुका आल्या की, का कुणास ठाउक ही मंडळी कोठेतरी गायब होतात. नेमक्या अशावेळीच महाराष्ट्रातील नागरिकांना येथील तरुणांना राजकारण आणि निवडणुकींविषयी अधिक जागरुक करण्याची गरज असते. परंतु कूणीही जाणकार यात पुढे सरसावत नाही. यशवंतराव चव्हाणांपासूनच महाराष्ट्राचा इतिहास अशावेळी तरुण पिढीसमोर उकलून ठेवण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते. काही सामाजिक संस्था आणि निवडक माणसे यासाठी प्रयत्नही करताहेत, परंतु तेवढा प्रयत्न पुरेसा नाही. याकरीता व्यापक अभियान उभे करण्याची गरज आहे. आजची बदलती राजकीय परिस्थिती, बदलती समीकरणे आणि सत्तेच्या हव्यासापोटी अधिकाधिक खालच्या थराला जात असलेले राजकारण यामुळे जनमानसाच्या मनात राजकारणाबदृल कटुता निर्माण होत चालली आहे. ज्या लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडून या लोकशाहीची स्थापना केली, त्या लोकशाहीच्या मनातच स्वत:बदृल अशी भावना निर्माण होणे हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने फारच घातच आहे. त्यामुळेच आज देशाची तरुण पिढीही या क्षेञाकडे हिन नजरेने पहायला लागली आहे. सुशिक्षीत वर्ग तर "हा गाव आपला नाही" अशी भूमिका घेउन मतदानाच्या हक्कापासूनच फारकत घ्यायला लागला आहे. केवळ निवडणुकीच्या निमित्ताने सुटी मिळते, ऐवढाच काय तो फायदा अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण होतेय जी भविष्यात फार धोकादायक वळण घेउ शकते. त्यामुळे आज सजग आणि सपन्न अशा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी एक व्यापक मोहिम राबविण्याची गरज आहे. काही स्वार्थी राजकारण्यांची अं:धकाराच्या खाईत लोटलेल्या लोकशाहीलाच या जोखडातून मुक्त करण्याची गरज आहे. चला तर या नवीन लढाईला आज नव्हे तर आतापासूनच सुरुवात करुयात. आपल्याला अश्वासनांची खैरात वाटणाऱ्या या राजकारण्यांना आता आपण आपला जाहिरनाम ऐकवायचा. त्यासाठी या रिंगणात उतरायलाच हवे!
very true !!
ReplyDeleteI truly support your thoughts and feelings.
ReplyDelete